BACK
HOME

कन्यादान योजना

• उद्दिष्ट:
समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटुंबांचा विवाहावर होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्वयंसेवी ससंस्थाना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे.

• लाभाचे स्वरूप
1. महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौद्धसह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारी समाजासह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना रु.20,000/- हजार इतके अर्थसहाय्य वधूच्या आई वडिल किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी देण्यात येते.
2. सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था वा संघटनांना प्रत्येकी जोडप्यामागे रु 4 हजार प्रोत्साहनपर अनुदान सन २०१६ पासून देण्यात येते.